विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...

- विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...LIVE: हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार यांचे निधन निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी कायम, दोषींची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली #NirbhayaRapeCase कुडाळ - दहावीत कमी गुण मिळाल्याने 16 वर्षीय मुलीची आत्महत्या; नदीत सापडला मृतदेह राज्य सरकारची भूमिका ,विचारसरणी ही संतांची आहे, मनूची नाही - मुख्यमंत्री #devendrafadnavis #nagpur #sambhajibhide संभाजी भिडे तुकाराम महाराज आणि इतर संतांपेक्षा मनू विचार सरणी मोठी आहे, असे वक्तव्य करतात, हे काय चाललंय, याच्या मागे बोलविता धनी कोण : अजित पवार #sambhajibhide पावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना आज (सोमवार) सुटी घोषित, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा #VinodTawde विधानभवनातील तयारीसंदर्भात कमतरता करणाऱ्याची चौकशी करून कारवाई केली जाईल #nagpur #devendrafadnavis मुंबईत रविवारी दिवसभरात १२२ मिमी पावसाची नोंद #rain #monsoon #mumbai नागपूरच्या पुरातील पीडितांना नुकसान भरपाई देणार. मुख्यमंत्री फडणवीस .....

Wednesday, November 23, 2016

नोटबंदीच्या निर्णयावर 'अर्थक्रांती'चे प्रणेते अनिल बोकील नाराज

अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील यांनी नोटबंदीबाबत पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलं आहे. ‘नोटबंदीसाठी आम्ही जसा प्रस्ताव दिला होता. त्याप्रमाणे तो सरकारनं लागू केला नाही.’ असं म्हणत बोकील यांनी नाराजी व्यक्त केल्याचं वृत्त ‘मुंबई मिरर’नं दिलं आहे.

सरकारनं नोटबंदीचा प्रस्ताव तर मान्य केला पण तो अर्धवट मान्य केला. त्यामुळे अनिल बोकील पंतप्रधान मोदींची पुन्हा एकदा भेट घेणार.

अनिल बोकील यांनी जुलैमध्ये मोदींची भेट घेऊन त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी त्यांनी पाच प्रमुख मुद्दे त्यांच्यासमोर मांडले होते. ज्यामधील सरकारनं केवळ दोनच गोष्टी लागू केल्या. त्यामुळेच जनतेला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. असं बोकील यांचं म्हणणं आहे.

अनिल बोकिलांनी दावा केला आहे की, त्यांच्या संघटनेकडून तयार करण्यात आलेल्या रोडमॅपनुसार अंमलबजावणी झाली असती तर लोकांना मनस्ताप सहन करावा लागला नसता. सरकारनं नोटबंदीसोबत केंद्र ,राज्यात लागू असलेली करप्रणाली बंद करणं गरजेचं होतं. पण तसं न करता फक्त नोटबंदीचा निर्णय लागू करण्यात आला.

नोटाबंदीसाठी अनिल बोकीलांनी मांडले होते हे मुद्दे:

1. आयकरासहित एकूण ५६ प्रकारचे कर रद्द करावे. फक्त  आयात कर कायम ठेवण्यात यावा.

2. बँक ट्रॅन्जॅक्शन टॅक्स हा एकच कर असावा. तो कर जास्तीत जास्त २ टक्के आणि कमीतकमी ०.७ टक्के असावा.

3. चलनात असलेल्या मोठ्या नोट्या म्हणजेच 1000, 500 आणि 100च्या नोटा चलनातून रद्द कराव्यात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर पडेल.

4. सर्व आर्थिक व्यवहार एका मर्यादे पलीकडे बँकेमार्फत करण्याची सक्ती करावी.

5. रोख पैशांच्या व्यवहारावर मर्यादा घालण्यात यावी.

No comments:

Post a Comment