पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याबाबत कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. नागरिकांनी अशा नोटा बँकेमध्ये जावून बदलून घ्याव्यात. त्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. अनावश्यक गर्दी टाळून नागरिकांनी बँकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आज केले.
जिल्ह्यातील प्रमुख बँकर्स, पेट्रोल पंप असोसिएशन, व्यापारी असोसिएशन तसेच विभाग प्रमुखांची तातडीची बैठक आज घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक अहिलाजी थोरात, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक राजीव प्रसाद, आयडीबीआय बँकेचे प्रबंधक अनिल गोडबोले, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र रुणवाल, डॉ. श्रीकांत भोई आदींसह प्रमुख बँकर्स उपस्थित होते.
11 नोव्हेंबर पर्यंत रात्री 12.00 वा. पर्यंत रुग्णालय, औषध दुकाने, पेट्रोल, डिझेल, गॅस पंप, रेल्वे तिकीट, विमान तिकीट, या ठिकाणी स्वीकारल्या जातील. उद्या
बँकांनी येणाऱ्या ग्राहकांसाठी मराठीमध्ये ठळक सूचना फलक लावावेत. त्याचबरोबर सर्वसामान्य गरजवंताना प्रथम प्राधान्य द्या. मोठ्या ग्राहकांना समजावून सांगा.
सर्व सामान्य जनजीवन सुरळीत रहावे, त्यावर परिणाम होणार नाही याची सर्वांनीच काळजी घ्यावी. नागरिकांनीही घाबरुन जावू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. ज्या बँकेमध्ये आपले खाते आहे. त्या ठिकाणी जावून पाचशे रुपये आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून घ्याव्यात खातेदार नसणाऱ्या ग्राहकांनाही आपल्या ओळखपत्रासह चार हजार रुपयापर्यंत नोटा बदलून मिळतील. त्यासाठी त्यांचे ओळखपत्र आवश्यक आहे. ऑनलाईन बँकींग, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड याद्वारे नागरिकांनी आपले व्यवहार करावेत. ग्राहकांनीही सांमजस्याने आणि शांततेने उद्या बँकांमध्ये आपले व्यवहार करावेत. त्यासाठी सर्व बँका चांगल्या सुविधा देण्यासाठी सज्ज आहेत. पोस्ट खात्यानेही नागरिकांसाठी ठळक अक्षरात सूचना फलक लावावेत. स्टेट बँक ऑंफ इंडियाने येणाऱ्या नव्या नोटा सर्व बँकांना वितरीत करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही श्री. मुद्गल यांनी दिल्या. कोणताही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी उद्या बँकांना पोलीस बंदोबस्त देण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्री. पाटील यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या शाखांमार्फत ग्रामीण भागामध्ये सर्व सामान्य माणूस हाच प्रथम प्राधान्य ठेवून उद्या व्यवहार करावेत, असे सांगून निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वाघमारे म्हणाले, बँकर्स आणि नागरिक यांनी कोणतीही काळजी करु नका जिल्हा प्रशासन तुमच्या पाठीशी आहे. देशाच्या विकासासाठी घेण्यात आलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे. त्यासाठी सर्वांनीच संयम ठेवावा. तुमचे कोणतेही पैसे बुडणार नाहीत ते सुरक्षीत आहेत. 30 डिसेंबरपर्यंत पैसे बदलण्यासाठी काही कारणांने शक्य झाले नाही तरी घाबरुन जावू नये. त्यानंतरही आवश्यक कागदपत्रांद्वारे तुमचे पैसे खात्यात जमा करण्यात येणार
जिल्ह्यातील प्रमुख बँकर्स, पेट्रोल पंप असोसिएशन, व्यापारी असोसिएशन तसेच विभाग प्रमुखांची तातडीची बैठक आज घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक अहिलाजी थोरात, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक राजीव प्रसाद, आयडीबीआय बँकेचे प्रबंधक अनिल गोडबोले, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र रुणवाल, डॉ. श्रीकांत भोई आदींसह प्रमुख बँकर्स उपस्थित होते.
11 नोव्हेंबर पर्यंत रात्री 12.00 वा. पर्यंत रुग्णालय, औषध दुकाने, पेट्रोल, डिझेल, गॅस पंप, रेल्वे तिकीट, विमान तिकीट, या ठिकाणी स्वीकारल्या जातील. उद्या
बँकांनी येणाऱ्या ग्राहकांसाठी मराठीमध्ये ठळक सूचना फलक लावावेत. त्याचबरोबर सर्वसामान्य गरजवंताना प्रथम प्राधान्य द्या. मोठ्या ग्राहकांना समजावून सांगा.
सर्व सामान्य जनजीवन सुरळीत रहावे, त्यावर परिणाम होणार नाही याची सर्वांनीच काळजी घ्यावी. नागरिकांनीही घाबरुन जावू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. ज्या बँकेमध्ये आपले खाते आहे. त्या ठिकाणी जावून पाचशे रुपये आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून घ्याव्यात खातेदार नसणाऱ्या ग्राहकांनाही आपल्या ओळखपत्रासह चार हजार रुपयापर्यंत नोटा बदलून मिळतील. त्यासाठी त्यांचे ओळखपत्र आवश्यक आहे. ऑनलाईन बँकींग, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड याद्वारे नागरिकांनी आपले व्यवहार करावेत. ग्राहकांनीही सांमजस्याने आणि शांततेने उद्या बँकांमध्ये आपले व्यवहार करावेत. त्यासाठी सर्व बँका चांगल्या सुविधा देण्यासाठी सज्ज आहेत. पोस्ट खात्यानेही नागरिकांसाठी ठळक अक्षरात सूचना फलक लावावेत. स्टेट बँक ऑंफ इंडियाने येणाऱ्या नव्या नोटा सर्व बँकांना वितरीत करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही श्री. मुद्गल यांनी दिल्या. कोणताही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी उद्या बँकांना पोलीस बंदोबस्त देण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्री. पाटील यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या शाखांमार्फत ग्रामीण भागामध्ये सर्व सामान्य माणूस हाच प्रथम प्राधान्य ठेवून उद्या व्यवहार करावेत, असे सांगून निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वाघमारे म्हणाले, बँकर्स आणि नागरिक यांनी कोणतीही काळजी करु नका जिल्हा प्रशासन तुमच्या पाठीशी आहे. देशाच्या विकासासाठी घेण्यात आलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे. त्यासाठी सर्वांनीच संयम ठेवावा. तुमचे कोणतेही पैसे बुडणार नाहीत ते सुरक्षीत आहेत. 30 डिसेंबरपर्यंत पैसे बदलण्यासाठी काही कारणांने शक्य झाले नाही तरी घाबरुन जावू नये. त्यानंतरही आवश्यक कागदपत्रांद्वारे तुमचे पैसे खात्यात जमा करण्यात येणार
No comments:
Post a Comment