विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...

- विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...LIVE: हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार यांचे निधन निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी कायम, दोषींची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली #NirbhayaRapeCase कुडाळ - दहावीत कमी गुण मिळाल्याने 16 वर्षीय मुलीची आत्महत्या; नदीत सापडला मृतदेह राज्य सरकारची भूमिका ,विचारसरणी ही संतांची आहे, मनूची नाही - मुख्यमंत्री #devendrafadnavis #nagpur #sambhajibhide संभाजी भिडे तुकाराम महाराज आणि इतर संतांपेक्षा मनू विचार सरणी मोठी आहे, असे वक्तव्य करतात, हे काय चाललंय, याच्या मागे बोलविता धनी कोण : अजित पवार #sambhajibhide पावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना आज (सोमवार) सुटी घोषित, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा #VinodTawde विधानभवनातील तयारीसंदर्भात कमतरता करणाऱ्याची चौकशी करून कारवाई केली जाईल #nagpur #devendrafadnavis मुंबईत रविवारी दिवसभरात १२२ मिमी पावसाची नोंद #rain #monsoon #mumbai नागपूरच्या पुरातील पीडितांना नुकसान भरपाई देणार. मुख्यमंत्री फडणवीस .....

Monday, October 31, 2016

बदामाचे फायदे.

बदाम हे पौष्टीक गुणांनी भरलेलं आहे. बदाममध्ये विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नीशियम, ओमेगा-3, फॅटी अॅसिड्स यासारखे अनेक पोषक तत्व असतात. बदाम हे पाण्यात भि़जवून खाल्ले पाहिजेत कारण यामुळे त्याच्यावरचं टरफल किंवा साल ही बदामावरुन सहज निघून जाते. बदामावरच्या सालीवर टॅनीन नावाचं एक तत्व असतो जो बदामातील इतर पोषक तत्वांचं अवशोषण करण्यास रोकतो. बदामावरचं साल तसंच राहिल्यास त्याच्या तुमच्या शरीराला अधिक फायदा होत नाही. त्यामुळे त्यावरचं साल निघून जाणं अधिक महत्त्वाचं असतं.
बदामाचे फायदे.
१. भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले तर त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात. २.बदामांच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. रात्री झोपतांना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतले तर सर्दी कमी होते.
३. बदामाने काही काळ भूक भागवली जाते.
४. डाएटिंग करणारी लोक अधिक प्रमाणात बदाम खातात. डाएटिंग करणारे भूक लागल्यास इतर पदार्थांपेक्षा १२ बदाम खातात. हे बारा बदाम एका ब्रेकफास्टचे काम करते.
५. बदामामुळे पोषक द्रव्ये मिळतात आणि कॅलरीजही वाढत नाहीत.
६. मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्ल्यास त्यांची शुगर लेवल नियंत्रणात राहते.
७. संशोधनादरम्यान स्पष्ट झालं की, दररोज मुठभर बदाम खाल्ल्यास हृद्याचे आजार कमी होतात. बदाम खाल्ल्यानं हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह नीट होतो.
८. बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. जे रक्त शुध्दीकरण करण्यास उपयुक्त ठरते.
९. बदामामुळे कोरडी त्वचा असणार्‍यांना त्वचेचा स्निग्धपणा वाढवण्यास मदत होते.
१०. बदामाच्या सेवनाने केस गळण्याचे प्रमाणही कमी होते.

Sunday, October 30, 2016

आघड्यांच्या माळा आणि अपक्षांचे सुट्टे फटाके

देशभरात दिवाळी उत्साहात साजरी होत असतानाच जिल्हय़ातील शहरांमधे पहिली अंघोळ जयघोषाने झाली. वार्डावार्डातील नेते-पुढाऱयांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनाने रात्रीउशिरापर्यंत रस्ते गर्दिने माखून गेले होते. शुक्रवारची रात्रीपासूनच स्थानिक राजकारणाची चक्रे गतिमान झाली होती. याची जिरव-त्याची जिरव करत दिवाळीच्या भल्या पहाटे आघाडय़ांनी उमेदवारांच्या माळा वाजवल्या तर अपक्षांनी आपाले सुट्टे फटाके नेत्यांच्या पायात वाजवले. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आठ पालिकांमधे 3,000 जणांनी अर्ज दाखल केले असून यंदा होत असलेल्या थेट नगराध्यक्षपदासाठी 100 जणांनी बाशिंग बांधले आहे.

दरम्यान, केंदात आणि राज्यातील सत्ताबदलाचे पडसाद स्थानिक पातळीवरही दिसू लागले असून राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या सातारा जिल्हय़ात यंदा सेना, भाजपातही चांगला उत्साह जाणवून येत आहे. आता त्यांची डाळ किती शिजणार हे वेगळे असले तरी जिल्हय़ातील सर्वच नेत्यांची अपक्ष व बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली आहे. बुधवारी छाननी व 11 नोव्हेंबरला अर्ज माघारी घेण्याच्या दिवसांपर्यंत मात्र घोडेबाजाराला ऊत असणार आहे.

साताऱयात दोन्ही राजांच्या आघाडय़ांत होणार घमासान लढाई

साऱया जिल्हय़ाचे लक्ष लागून राहिलेल्या साताऱयातील निवडणूक ऐन रंगात आली आहे. राजघराण्यातील मनोमिलन तुटण्याबरोबरच राजस्नुषा वेदांतिकाराजे भोसले यांची थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. अर्ज दाखल करतानाच दोन्ही राजांनी दात-ओठ घाऊन दिलेल्या प्रतिक्रियांमुळे दोन्ही आघाडय़ांमधे घमासान लढाई होणार असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. भाजपानेही या लढाईचा लाभ  उठवण्याची पुर्ण तयारी केली आहे.

कराडात माजी मुख्यमंत्री विरूद्ध आमदार अशीच रंगत येणार

अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगत राहिलेल्या कराडच्या राजकारणाने निर्णायक वळण घेतले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील यशवंत जनशक्ति आघाडीकडे  राजेंद्रसिंह यादव, जयवंतराव पाटील, अरूण यादव यांच्यासह दिग्गजांची मांदीयाळी वाढल्याने सत्ताधारी लोकशाही आघाडीला आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली निकराची लढत देणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यातच अतुल भोसलेंच्या भाजपा व उंडाळकराची तिसरी आघाडी रिंगणात आहेच. त्यामुळे कराडात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरूद्ध आमदार बाळासाहेब पाटील हा संघर्ष आत्ताच निर्णायक वळणवर गेल्याचे मानले जात आहे.

फलटणांत राजे गटाने पुन्ह एकदा डावच गुंडाळण्याची आखली रणनिती

विरोधकांनी पाच वर्ष संघर्ष करायचा आणि ऐनवेळी राजे गटाने खेळी करायची ही रित यंदाही अवंलबण्यात आली. ऐनवेळी विरोधकांचे मोठे नेते आपल्या गटात घेत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरांच्या राजेगटाने विरोधकांचा डाव मोडित काढल्याचे मानले जात आहे.

कोरेगावकरांनी नेत्यांशिवाय निवडणूक घेतली आपल्या हातात : कोरेगावातील राजकारणाने अंतिम दिवसांपर्यंत आपला रंग झाकुनच ठेवला.  काँग्रस पक्ष, राष्ट्रवादी, सेना व भाजपातून अर्ज दाखल झाले असले तरी शनिवारी कोरेगावात कोणत्याही ‘बाहेर’च्या नेत्याला प्रवेश दिला गेला नाही. गावची निवडणूक गावातल्या माणसांमधेच राहिली पाहिजे असा न कळत फतवा निघाला की काय? असा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती होती.

Saturday, October 29, 2016

उदयनराजेंचा यल्गार

सातारा : डिसेंबर मध्ये सातार्यात नागरपालिकेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीपूर्वी मनोमिलनाचा भरपूर प्रयत्न झाला पण काही कारणांमुळे सातारा विकास आणि नगरविकास आघाडीने वेगळे वेगळे लढन्याचा निर्णय घेतला. दोन्हीकडे काही नगरसेवक आले काही गेले. या रणधुमाळित भाजप व् रासप युति तर मनसेने पण आपले दंड थोपटले आहेत.
उदयनाराजेनि स्वताच्या बळावर 40-0 अशी निवडणूक जिंकून दाखविन्याचा निर्धार केला आहे अन्यथा मी खासदारकिचा राजीनामा देईन असे सुतोवाच केले आहे.

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा .....


सातारा विकास आघाडीचे माजी नगर अध्यक्ष नासिर शेख नगर विकास आघाडीत सामील

सातारा विकास आघाडीचे माजी नगरअध्यक्ष नासिर शेख नगर विकास आघाडीत सामील
सातारा : सातारा विकास आघाडीने उमेदवारी देण्यास नकार दिल्याने मा. नगराध्यक्ष नासिरभाई शेख यांनी तडकाफडकी नगर विकास आघाडीत सामील झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. प्रभाग ६ मधून नगर विकास आघाडीने नगरसेवक जयंवंत भोसले यांच्या पत्नीला तिकीट जाहीर केल्याने या वार्डात रंगतदार लढत होणार आहे. नासिर शेख यांनी गेले १५ वर्षे या वार्डात विकास कामे केल्याने व त्यांना उमेदवारी न दिल्याने येथे कोण कोणाला साथ देतेय हे पाहायला मिळणार आहे.
सातारा विकास आघाडी कडून माजी नगरसेवक व उदयनराजेंचे कट्टर समर्थक अल्लीशेठ शेख यांना या वार्डात उमेदवारी मिळाली आहे. नासिर शेख यांनी आघाडी बदलण्याचा घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे असे लोकमत समोर आले आहे. पुढे काय काय घडामोडी होतील हे पाहणे मजेशीर आहे.
 

Wednesday, October 26, 2016

Good Morning



 

विचारमाध्यमच्या सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेछा...

विचारमाध्यमच्या सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेछा...

चिपळूणमध्ये मुस्लिम समाजाचा एल्गार..मुकमोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद


चिपळूणः येथे आयोजित चिपळूण तालुका मुस्लिम मूक मोर्चाला हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला .आपल्या न्याय हक्कासाठी तालुक्यातील मुस्लिम समाज एकवटला होता.
शहरातील खेडेकर क्रिडा संकुला पासुन या मोर्चाला सुरूवात झाली, तत्पुर्वी प्रमुख वक्त्यानी उपस्थित हजारो बांधवासमोर आपल्या भावना व्यक्त करताना, मुस्लिमाना ५% आरक्षण मिळालेच पाहिजे तसेच तल...ाख पध्दतीमध्ये शासनाचा हस्तक्षेप शरीराच्या विरोधात असल्यामुळे सहन केला जाणार याचा प्रामुख्याने उल्लेख केला..हातात तिरंगा व प्रमुख मागण्याचे बँनर्स घेऊन निधालेला हा मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने कोणतीही घोषणा वा नारेबाजी न करता तहसिलदार कार्यालयात पोहोचला .स्वंयसेवकानी उत्तम जबाबदारी पार पाडली. मोर्चाला सकल मराठा समाजाने पाणी वाटप करुन सहभाग नोंदविला..तहसिलदाराना निवेदन सादर केल्यानंतर राष्ट्रगिताने मोर्चाची समाप्ती झाली......

न्यूझीलंडकडून भारताचा 19 धावांनी पराभव

रांची : ‘प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर तळातील फलंदाजांनी नांगी टाकतात‘ हे वाक्‍य खोडून काढत भारताच्या तळातील फलंदाजांनी खोडून काढत न्यूझीलंडला आज (बुधवार) झुंज दिली. पण चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 19 धावांनी पराभव झाला. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 2-2 अशी बरोबरी साधली. न्यूझीलंडने भारतासमोर 261 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताचा डाव 241 धावांत संपुष्टात आला.

केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली. या दौऱ्यात सूर हरपलेल्या मार्टिन गुप्टीलसह टॉम लॅथमने धडाक्‍यात सुरवात केली. या दोघांनी पहिल्या दहा षटकांत 80 धावा चोपल्या होत्या. त्यामुळे कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दोन्ही बाजूंनी फिरकी गोलंदाजांच्या हाती चेंडू दिला. यामुळे न्यूझीलंडची धावगती कमी झाली. पुन्हा आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नांत अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर लॅथमने अजिंक्‍य रहाणेकडे झेल दिला. त्यानंतर केन विल्यम्सन आणि गुप्टील यांनीही चांगली भागीदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर न्यूझीलंडकडून मोठ्या भागीदारी झाल्या नाहीत. भारताकडून अमित मिश्राने दोन गडी, तर उमेश यादव, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरवात खराब झाली. रोहित शर्मा पुन्हा एकदा लवकर बाद झाला. विराट कोहली आणि अजिंक्‍य रहाणेने चांगली भागीदारी करत डाव सावरला. ईश सोधीच्या गोलंदाजीवर कोहली 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर धोनीच्या साथीत रहाणेने पुन्हा एकदा भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. पण अर्धशतक झळकाविल्यानंतर रहाणेही बाद झाला. त्यानंतर भारताचे प्रमुख फलंदाज काहीही कमाल करू शकले नाहीत. फलंदाजीत बढती मिळालेला अक्षर पटेल, अमित मिश्रा, धवल कुलकर्णी आणि उमेश यादव यांनी चांगली झुंज देत भारताला विजयाच्या जवळ नेले. 49 व्या षटकात आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नांत यादव बाद झाला.

संक्षिप्त धावफलक:
न्यूझीलंड : 50 षटकांत 7 बाद 260

मार्टिन गुप्टील 72, टॉम लॅथम 39, केन विल्यम्सन 41, रॉस टेलर 35
भारत : 48.4 षटकांत सर्वबाद 241 अजिंक्‍य रहाणे 57, रोहित शर्मा 11, विराट कोहली 45, महेंद्रसिंह धोनी 11, अक्षर पटेल 38, मनीष पांडे 12, केदार जाधव 0, हार्दिक पंड्या 9, अमित मिश्रा 14, धवल कुलकर्णी नाबाद 25, उमेश यादव 7 

शहराला दिवाळीची चाहूल, खरेदीसाठी गर्दी


आता केवळ तीन दिवसावर दिवाळी येऊन ठेपली आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. कपडय़ाबरोबर, उटणे, मोती साबण, तेल याचीही खरेदी जोमात चालली आहे. तर काही जणांचे फराळ करुन पूर्ण झाले आहेत, तर काही जणांच्या घरावर विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे.  एकंदर शहराला दिवाळीची चाहूल लागली आहे.

दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे चैतन्य आणि दिवाळी म्हणजे नवीन कपडे. दिवाळी आणि नवीन कपडयांचे अतूट असे समीकरण आहे. साडय़ांच्या दुकानात महिलांनी गर्दी केली आहे. सिल्क, पैठणी, शालू असा साडयांपेक्षा डिझानर साडयांना महिला जास्त पसंती देत आहेत. तर तरुणीमध्ये इंडो वेस्टर्न कुडती, मस्तानी ड्रेसला तर तरुणांमध्ये डेनिमचे शर्ट व वॉश, जॉगर्सच्या जीन्सची क्रेझ आहे.

ऑक्टोबर हा थंडीचा महिना. थंडीत आपली त्वचा उकलते. त्यामुळे तेल व उटणे लावून आंघोळ केल्याने त्वचा चांगली राहते. दिवाळी ही थंडीतच येत असल्याने दिवाळीदिवशी तेल, उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. अभंग स्नानासाठी बाजारात अनेक प्रकारचे तेल, साबण, उटणे आले आहेत. साबणामध्ये गुलाब, चंदन, मोती साबणाबरोबरच, केवडा, विभूती, अष्टगंध, उपटण, केसर, कोरफड, तुलसी, जास्मिन, खस, पंचामृत, मध असे प्रकार आले आहेत. तसेच उटण्यात घालण्यासाठी हिना, अलफान्सो, रातराणी, गुलाब अशा प्रकारचे अत्तर बाजारात उपलब्ध झाले आहेत. अभंग स्नानासाठी पूर्वी तीळाचे तेल लावले जात होते. परंतु आता बाजारात वेगवेगळे सुगंधी तेल आले आहेत.

मोबाईल, सोशल नेटवर्किंगच्या जमान्यातही दिवाळीचा शुभसंदेश पोहोचविण्यासाठी नागरिकांकडून ग्रीटिंग्ज कार्डसना पसंती दिली जात आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतला शुभेच्छापर मजकूर असलेल्या ग्रीटिंजना सर्वसामान्य ग्राहकांकडून मोठय़ा प्रमाणात पसंती दिली जात आहे. दिवाळीत आपल्या आवडत्या व्यक्ती, नातेवाईक, स्नेही यांना ग्रीटिंग पाठवतो. हा एक आनंद उत्सवाचा भाग असतो. तर सातारा शहरातील अनेक गिफ्ट शॉपी मध्ये शुभेच्छा पत्र आले आहेत. तर 25 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत बाजारात ग्रीटिंग उपलब्ध झाले आहेत. त्यांची खरेदीही होत आहे.

कराडची बाजारपेठ फुलली

कराडः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कराडच्या बाजारपेठेतही साहित्य खरेदीसाठी गर्दी होऊ लागली असून शहरातील मुख्य बाजारपेठेसह सर्वच रस्ते ग्राहकांनी फुलले आहेत.

दिवाळी अवघ्या आठवडाभरावर आलेली असतानाही बाजारपेठेत शांतता असल्याने व्यापाऱयांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत होते. मात्र सोमवारी दुपारनंतर बाजारपेठे ग्राहकांची गर्दी होऊ लागल्याने व्यापाऱयांतून समाधान व्यक्त होत आहे. मंगळवारी कराडचा बंद दिवस असतानाही दिवसभर बाजारपेठ सुरू होती. तर खरेदीसाठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत होते.

दिवाळीचे आकर्षण असणारे विविध रंगरीबेरंगी आकाशकंदील, कपडे, रांगोळी, फटाके, पणत्या आदी प्रकारचे स्टॉल ठिकठिकाणी लागले आहेत. भेदा चौकातील पालिकेच्या मैदानात फटाका स्टॉलसाठी जागा दिली असून येथे मंडप उभारून स्टॉल उभारण्यात आले आहेत. फटाके खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. कपडय़ांची बाजारपेठही ग्राहकांनी फुलली आहे. लहान मुलांच्या कपडय़ांबरोबरच मोठय़ांचाही रेडिमेड कपडय़ांकडे कल दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत कपडय़ांच्या दरात नाममात्र वाढ झाल्याचे व्यापाऱयांनी सांगितले.

यावर्षी राज्यभर होत असलेल्या मराठा क्रांती मोर्च्याच्या निमित्ताने दिवाळीवरही मराठा क्रांती मोर्च्याची छाप दिसून येत आहे. शहरात लागलेल्या आकाशकंदीलाच्या स्टॉलवर मोठय़ा मराठा आकाशदिवे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. 20 रूपयांपासून अडीचशे रूपयांपर्यंत वेगवेगळय़ा किमतीत हे आकाशकंदील विकले जात आहेत. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात मोठय़ा प्रमाणात शिरकाव केलेल्या चायना सारख्या परदेशी वस्तुंवर सोशय मिडीयातून मोठय़ा प्रमाणात बहिष्कार टाकण्यात आला. त्याचा परिणाम बाजारपेठेतील चायना मेड वस्तुवर दिसून येत आहे. यात मोठय़ा प्रमाणात पणत्या, लाईटच्या माळा, फटाक्यांना मार बसला आहे.

सलग तीन वर्षे पडलेल्या दुष्काळानंतर यावर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱयांसह सर्वस्तरातील लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे याचा परिणाम दिवाळीच्या खरेदीमध्ये दिसून येत असून मोठी उलाढाल यानिमित्ताने होत आहे.

 


Tuesday, October 25, 2016

LIVE: भाई समेत बर्खास्त मंत्रियों की वापसी कराएंगे मुलायम, बस थोड़ी देर में PC में करेंगे बड़ा ऐलान

आज तक समाजवादी पार्टी में उठा विवाद थमने का नाम नहीं ले रहा है. सोमवार को पूरे दिन पार्टी और यादव परिवार का हाई-वोल्टेज ड्रामा जारी रहा. लखनऊ में बैठक के दौरान हुए हंगामे के बाद से सुलह की कोशिश जारी रही, लेकिन सुलह का रास्ता नहीं निकल पाया. मंगलवार को मुलायम सिंह ने प्रेस कॉन्फ्रेंस की, जिसमें अखिलेश यादव शामिल नहीं हुए. हालांकि शिवपाल इस प्रेस कॉन्फ्रेंस में मुलायम के साथ रहे. संबंधित खबरें. साइकिल से मोटरसाइकिल पर सवार होने के लिए अखिलेश के सामने ये चुनौतियां! अखिलेश ने मंच पर दिखाए तेवर, देखें VIDEO. प्रेस कॉन्फ्रेंस में मुलायम सिंह ने कहा कि हमारा परिवार एक है,... ---

Monday, October 24, 2016

सायरस मिस्त्रींना 'टाटा'; रतन टाटांकडे जबाबदारी

मुंबई : नाट्यपूर्ण घडामोडींनंतर टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना आज हटविण्यात आले. रतन टाटा यांच्याकडे आता पुन्हा अध्यक्षपदाची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. नव्या अध्यक्षांची निवड येत्या चार महिन्यांत करण्यात येणार आहे.

टाटा सन्सच्या संचालक मंडळाची आज येथे बैठक झाली. त्या बैठकीत मिस्त्री यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. नवा अध्यक्ष निवडण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात स्वतः रतन टाटा, टीव्हीएस समूहाचे प्रमुख वेणू श्रीनिवासन, बसिन कॅपिटलचे अमित चंद्रा, माजी राजनैतिक अधिकारी रोनेन सेन आणि लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश आहे. भट्टाचार्य वगळता उर्वरित सर्व जण टाटा सन्सच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत.
मिस्त्री यांना हटविण्याची कारणे टाटा सन्सने दिलेली नाहीत. मात्र, तोट्यातील उद्योग बंद करण्याच्या व केवळ फायद्यातील उद्योगांकडे लक्ष देण्याच्या त्यांच्या धोरणामुळे समूहामध्ये नाराजी होती, असे बोलले जाते. यात प्रामुख्याने युरोपातील पोलाद उद्योग गुंडाळण्याच्या हालचाली कारणीभूत झाल्याचे समजते.
रतन टाटा हे 28 डिसेंबर 2012 रोजी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले होते. त्यांच्या जागी संचालक मंडळाने मिस्त्री यांची नियुक्ती केली होती. टाटा सन्सच्या संचालक मंडळामध्ये 2006 मध्ये मिस्त्री यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2011मध्ये त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्याकडे टाटांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. शापूरजी पालोनजी या कंपनीच्या शिफारशीवरूनच त्यांना अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली होती. टाटा सन्सचे सर्वाधिक समभाग याच कंपनीकडे आहेत.
काही दिवसांपूर्वीच सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहातील कर्मचाऱ्यांशी वेबसाइटच्या माध्यमातून संवाद साधला होता. समूहाच्या खडतर काळात चपळता आणि धिटाई अंगी बाणवणे आवश्‍यक असल्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले होते. सहा खंडांतील 100 देशांमध्ये "टाटा‘ने आपला कारभार पसरविला आहे.

हकालपट्टी बेकायदा सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी बेकायदा असल्याचा दावा शापूरजी पालोनजी समूहातर्फे करण्यात आला आहे. शापूरजी पालोनजी हे टाटा समूहाचे सर्वांत मोठे समभागधारक आहेत. विशेष म्हणजे पालोनजी यांनीच सायरस मिस्त्री यांना "टाटा सन्स‘चे अध्यक्षपद देण्यात यावे, अशी शिफारस केली होती.

टाटा समूहाची धुरा सांभाळल्यानंतर सायरस मिस्त्री यांच्याकडून जेवढ्या प्रमाणात अपेक्षा होत्या, तेवढ्या त्या पूर्णत्वास जात नसल्याची चर्चा होती. आश्वासनांची पूर्तता करण्यात त्यांना फारसे यश मिळत नसल्याचे म्हटले जात होते. विशेषतः युरोपमधील स्टीलचा व्यवसाय योग्यरीत्या हाताळता न आल्याचा अप्रत्यक्ष ठपका त्यांच्यावर ठेवला जातो. युरोपातील टाटा स्टील प्रकल्प विकण्याचा निर्णय त्यांच्या कारकिर्दीत घेण्यात आला. शिवाय नफ्यात न चालणाऱ्या कंपन्यांकडे दुर्लक्ष आणि फक्त दुभत्या कंपन्यांकडेच लक्ष देण्याची भूमिका टाटा सन्सला रुचली नसल्याचे बोलले जाते. त्यातच टाटा आणि जपानी "डोकोमो‘ यांची लाभाची गणितेदेखील जुळली नाहीत. भारतात गाजलेल्या टू-जी दूरसंचार गैरव्यवहारामुळे कंपनीला विस्तार करण्यावर निर्बंध आले आणि परिणामी कंपनीला थ्रीजी सेवेचा विस्तार करता आला नाही. यामुळे "डोकोमो‘ने टाटाकडे 1.2 अब्ज डॉलरची मागणी केली आहे. मिस्त्री यांच्याविषयी नाराजी वाढण्यास अशाही घटना कारणीभूत ठरत गेल्या असाव्यात, अशा प्रतिक्रिया जाणकांरांकडून व्यक्त केल्या जात आहेत. टाटासमूहातील टीसीएस, टाटा मोटर्स वगळता टाटा केमिकल्स, टाटा पॉवर अशा सर्वच कंपन्यांमध्ये मंदीसदृश वातावरण आहे.

Sunday, October 23, 2016

शिवथर(सातारा) येथे घरफोड्या

शिवथर येथे पाच घरफोड्या
शिवथर, ता. सातारा येथे शनिवारी चोरट्यांनी एकाच रात्रीत पाच घरफोड्या केल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घरफोड्यांमध्ये चोरट्यांच्या हाती पैसे अथवा दागिने असा काहीच ऐवज न लागल्याने त्यांनी किंमती कपडे लंपास केली.
शिवथर येथे चोरट्यांनी एकाच ठिकाणची बंद असलेली घरे कटावणीच्या सहाय्याने कडीकोयडे तोडून प्रथम आजूबाजूच्या सर्व घरांना बाहेरून कड्या  लावल्या. प्रथम सुनील नारायण साबळे यांच्या पानटपरीचे कुलूप तोडून 1 हजारांची रोकड लंपास केली. त्यानंतर शेजारीच विजय उत्तम साबळे यांचे बंद घर फोडले. परंतु तेथे हाती काहीही न लागल्याने शेजारील बंद असलेले भानुदास हरी साबळे व सुभाष हरी साबळे या भावांची घरे फोडली व सर्व सामानाची नासधूस केली. सुभाष साबळे यांच्या घरातील कटावणीने कपाट फोडून त्यामधील किंमती कपडे चोरली. सुभाष साबळे यांच्याच घरात पानपट्टीमधील चोरून नेल्याची चिल्लर मोजून 50 पैशाची नाणी तिथेच ठेवून त्याच घरासमोरील सुरेश शंकर साबळे यांची धान्य  ठेवण्याची खोली फोडण्यात आली. त्याही ठिकाणी हाताला काहीच न लागल्याने चोरटे पसार झाले. 
पहाटे पाच वाजता सुभाष साबळे यांचा भाऊ अनिल साबळे यांना घराची दारे उघडी असल्याचे निदर्शनास आले. घटना घडल्यानंतर सकाळी पोलिस पाटील भारत साबळे यांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे असे वार्ताहार कडून समजले.

मनोमीलनाचा ‘सस्पेन्स’ कायम, मनोमिलनाची गाडी अध्यक्षपदावर आडकली

सातारा नगरपालिका निवडणूकित मनोमिलनाचे सर्व गणिते जुळली आहे. मात्र नगराअध्यक्षपद दोन्ही आघाडय़ांना हवे असल्यामुळे ही गाडी सध्या तरी अध्यक्षपदावर अडकलेली असल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले नगराध्यक्षपद हे थेट जनतेमधुन निवडून येणार असल्यामुळे व ते पाच वर्षासाठी असल्याने दोन्ही आघाडय़ांना हे पद आपल्याच पारडय़ात असावे असे वाटु लागले  इाहे.
सातारा नगरपालिकेत गेली दोन टर्म मनोमिलन पॅटर्नची सत्ता आहे. यंदा ही मनोमिलन होणार यात तीळ मात्र शंका नव्हती मात्र मुंबईतुन आरक्षण सोडत पध्दतीमध्ये सातारा नगयपालिकेसाठी नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले. यंदा नगराध्यक्ष हा थेट जनतेमधून निनवडूण येणार असल्याचे व तो सलग पाच वर्षासाठी असल्याने या पदाला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. व नेमके हेच पद दोन्ही आघाडय़ांना सध्या डोकेदुखीचे व जोखमीचे वाटत असल्याने ते आपल्याच ताब्यात रहावे अशी मानोमन इच्छा आहे. नगरविकास आघाडीला 22 तर सातारा विकास आघाडीला 17 व नगराध्यक्षपद मिळावे अशी इच्छा सातारा विकास आघाडीमधील नेतेमंडळीची आहे. तर नगरविकास आघाडी 22 जागा तुम्हाला घ्या व 17 जागा आम्हाला दय़ा व नगराध्यक्षपद आमच्याकडे दय़ा असा निरोप धाडत आहे. त्यामुळे अध्यक्षपदा भोवतीची चर्चा वाढत असुन येत्या दोन-तीन दिवसात त्यावर नक्कीच तोडगा निघेल असे दोन्ही आघाडय़ांना वाटत आहे.
मात्र अध्यक्षपदावरून गाडी पुढेच गेली नाही तर आयत्या वेळी पळापळ नको म्हणून दोन्ही आघाडीतील नेत्यांनी वार्ड निहाय उत्सुकांची यादी तयार करण्यास सुरूवात केली आहे.दोन्ही बाजुंकडे नगराध्यासह 40 उमेदवारांची यादी तयार केलेली आहे. परंतु ती पक्की नाही यामध्ये काही वार्ड सोडले तर अनेक अदला बदल होणार आहे. दोन्ही आघाडय़ांचे प्रयत्न हे मनोमिलन व्हावे याच दृष्टीने सुरू असताना पर्याय म्हणून अथवा एकमेकांवर दबाव तंत्रांचा वापर करण्यासाठी 40 उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.
नगरविकास आघाडीतर्फे वेदांतिकाराजे भोसले यांचे नाव चर्चेत असून त्या या पदाला योग्य न्याय देतील असे नगर विकास आघाडीमधील कार्यकर्त्यांना वाटत आहे. कर्तव्य सोशल गुपच्या माध्यमातुन अनेक सामाजिक कामे वेदांतीकाराजेंनी यशस्वी करून दाखवली आहेत. त्यांच्या मध्ये निर्णयक्षमता आहे. बचतगट पर्यावरण महाविद्यालय आदि चौफेर क्षेsत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा मटविला आहे. त्या जर नगराध्यक्ष झाल्या तर सातारा नगरपालिकेला शिस्तीबरोबरच विकासाची कामे झपाटय़ाने होतील तसेच राजघराण्यातील पहिल्याच महिला नगराध्यक्ष म्हणून ही त्यांना मात मिळणार असल्याचे नाविआच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे.
मनोमिलन झाल्यापासुन काहीही झाले तरी मनोमिलन तुटणार नाही असे नेहमीच उदयनराजे भोसले सांगत आले आहेत मनोमिलनावर अनेकवेळा संकटे आली परंतु ते अभेद्य राहिले यंदा मात्र थोडा नाजुक पण तितकाच महत्वाचा प्रश्न मनोमिलनाच्या अडसर बनला आहे. वेदांतिकाराजे भोसले जर नराध्यक्षा झाल्या तर नगरसेवकांची ठेकेदारांची टक्केवारी बंद होणार हे निश्चित तसेच सावियाच्या नगरसेवकांनाही फौजदार घेण्यास वेदांतिकाराजे डगमगणार नाहीत व ते एक दोन नव्हे तर तब्बल पाच वर्षासाठी नगराध्यक्ष म्हणून गकाम करणार हेच मुळी काहीजणांना डोकेदुखीचे वाटू लागले आहे. त्यामुळे टक्केवारी गँग एकत्र येवून नेत्यांचे कान फुंकू लागली आहे व आपली पोळी कशी भाजली जाईल हे पाहत आहेत व नेमके येथेच मनोमिलनाला मेख बसली आहे.
 

कोहली, धोनीने साकारला भारताचा विजय

मोहाली : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील चुकांची पुनरावृत्ती टाळत कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांनी रविवारी भारताला पुन्हा विजयी मार्गावर आणले. तिसऱ्या सामन्यात त्यांनी भारताला सात गडी राखून विजय मिळवून दिला.

न्यूझीलंडला चांगल्या सुरवातीनंतरही भारतासमोर मर्यादितच आव्हान ठेवता आले. त्यांचा डाव 285 धावांत संपुष्टात आला. भारताने 48.2 षटकांत 3 बाद 289 धावा केल्या. विराट कोहलीच्या (नाबाद 154) दीडशतकी खेळीला धोनीच्या 80 धावांची साथ मिळाली.
न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुन्हा एकदा रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे ही सलामीची जोडी अपयशी ठरली. पण, या वेळी कोहली आणि चौथ्या क्रमांकावर बढती घेणारा कर्णधार धोनी यांनी नियोजनपूर्ण खेळी करत भारताचा विजय आवाक्‍यात आणला. विजय समोर दिसत असताना धोनी बाद झाला. त्यानंतर कोहलीने मनीष पांडेला साथीला घेत भारताचा विजय साकार केला. या प्रवासात कोहलीने नाबाद 154 धावांची खेळी करताना धोनीच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी केली. त्यानंतर पांडेच्या साथीत 75 चेंडूत आक्रमक 97 धावांची नाबाद भागीदारी करून विजय साकारला. कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीमधील 26वे शतक साजरे केले. 

त्यापूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर न्यूझीलंडला सलामीच्या जोडीने चांगली सुरवात करून दिली. मात्र, बदली गोलंदाज केदार जाधवने न्यूझीलंडला पुन्हा चकित केले. त्यांची मधली फळी कोलमडून पडली. त्यांना चांगल्या सुरवातीचा फायदा उठवण्यात अपयश आले. एक वेळच्या 28 षटकांतील 2 बाद 150 अशा स्थितीतून न्यूझीलंडने 27 धावांत पाच गडी गमावले. 

न्यूझीलंडची अवस्था 8 बाद 199 अशी झाली. त्या वेळी निशामने मॅट हेन्‍रीला साथीला घेत भारतीय गोलंदाजीवर हल्ला चढवला. नवव्या विकेटसाठी या जोडीने 84 धावांची भागीदारी केल्यानंतर न्यूझीलंडचे आव्हान उभे राहू शकले. निशामने 47 चेंडूत 57 धावांची खेळी केली. हेन्‍री 37 चेंडूत 39 धावा काढून नाबाद राहिला. भारताकडून केदार जाधव आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड 49.4 षटकांत सर्वबाद 285 (टॉम लॅथम 61 -72 चौकार, 3 चौकार, 1 षटकार, जेम्स निशाम 57 -47 चेंडू, 7 चौकार, रॉस टेलर 44, मॅट हेन्‍री नाबाद 39, उमेश यादव 3-75, केदार जादव 3-29) पराभूत वि. भारत 48.2 षटकांत 3 बाद 289 (विराट कोहली नाबाद 154 134 चेंडू, 16 चौकार, 2 षटकार, महेंद्रसिंह धोनी 80 -91 चेंडू, 6 चौकार, 3 षटकार, मनीष पांडे नाबाद 28, मॅट हेन्‍री 2-56)
 
 

मोहाली वनडे - भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

New Zealand    
9/0 (2.1)
Run Rate: (Current: 4.15)     
 
Martin Guptill 6* (5) 1x4, 0x6          
Tom Latham     2 (8) 0x4, 0x6                   

Umesh Yadav (1.1-0-6-0)*                  

Hardik Pandya (1-0-3-0)

विश्‍वकरंडक कबड्डीत भारत अजेय :

अहमदाबाद : मध्यंतरानंतरची सहा गुणांची पिछाडी... वर्चस्वाला शह मिळण्यासाठी जमा झालेले काळे ढग अशा कठीण परिस्थितीत अजय ठाकूरने केलेल्या तुफानी आणि निर्णायक चढायांच्या जोरावर भारताने इराणचे आव्हान 38-29 असे मोडून काढले आणि सलग तिसऱ्यांदा विश्‍वकरंडक कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवले. या एका सामन्यात चढायांमध्ये तब्बल 12 गुण मिळवणारा अजय ठाकूर हाच भारताच्या विजयाचा खरा हीरो ठरला.
जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत इराणने भारताला नेहमीच कडवी लढत दिली आहे. त्यातच तीन खेळाडू प्रो कबड्डीत खेळत असल्यामुळे भारतासमोर आव्हान सोपे नव्हते. मध्यंतरानंतर 13-19 अशी पिछाडी दी एरिना ट्रान्सस्टेडिया येथे खच्चून गर्दी करणाऱ्या भारतीय पाठीराख्यांच्या काळजाचा ठोका चुकवत होती; पण याच कठीण परिस्थितीत बाजीगर होणारी कामगिरी करणाऱ्या अजयने कमालीच्या चढाया केल्या. त्याच्या झंझावातासमोर इराणचा भक्कम बचाव खचला. कर्णधार अनुप कुमारने पकड मिळताच संयमी खेळ करत संघाला विजयी पथावर ठेवले. अजय ठाकूरने सलग तीन सामन्यांत दहापेक्षा अधिक गुण मिळवले. नितीन थोमरनेही सहा गुण मिळवून त्याला चांगली साथ दिली. सुरजित आणि संदीप नरवालच्या पकडीही निर्णायक ठरल्या.
संदीप नरवाल आणि अजय ठाकूर यांनी आपापल्या पहिल्या चढाईत गुण मिळवले आणि भारताने 2-0 अशी शानदार सुरवात केली; पण मेराज शेखने आपली डु ऑर डाय चढाई असतानाही संदीप नरवालला बाद करून इराणला पहिला गुण मिळवून दिला. पाठोपाठ अब्दोफलनेही सुरेंद्र नाडाला चकवून बोनस गुण मिळवला. तेथेच इराणने आपली ताकद दाखवण्यास सुरवात केली. यंदाच्या प्रो कबड्डीतील सर्वांत यशस्वी चढाईपटू ठरलेल्या प्रदीप नरवालच्या सलग दोन पकडी झाल्या आणि भारताचा आत्मविश्वास काहीसा कमजोर होण्यास सुरवात झाली; पण अनुप आणि अजय ठाकूरने बोनस मिळवत 7-7 अशी बरोबरी साधली; पण मेराज शेखने आपल्या डु ऑर चढाईत मनजित आणि मोहित चिल्लर यांना बाद केले. भारताची बचाव फळी तेथे कमजोर झाली. मेराजने त्यानंतर राहुल आणि नाडा यांनाही बाद केले.
बघता बघता भारताकडे एकच खेळाडू शिल्लक असल्याने आणि चढाई करण्याची संधी असल्याने नितीन थोमरला मैदानात आणण्यात आले. त्याने बोनस आणि एक गुण मिळवत लोण टाळला असला तरी काही वेळात लोणची नामुष्की भारताला स्वीकारावी लागलीच. मध्यंतराला घेतलेली 18-13 अशी आघाडी इराणचे वर्चस्व सिद्ध करू लागली होती. मध्यंतरानंतर भारताला संयम राखत सर्वस्व देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातच सुरवातीस मेराजने मनजित चिल्लरला बाद केले. त्यानंतर मनजितला राखीव खेळाडू करण्यात आले; पण अजय ठाकूरने एकाच चढाईत दोन गुण मिळवले. त्यामुळे संपूर्ण संघात चैतन्य संचारले आणि तेथूनच सामन्यास कलाटणी मिळत गेली. 20-20 बरोबरी साधल्यानंतर 10 मिनिटे शिल्लक असताना इराणवर लोण दिला. भारताने 24-21 अशी आघाडी घेतली आणि मग मागे वळून पाहिले नाही.
 

Saturday, October 22, 2016

मा. सादिकभाई याना आवामी विकास पार्टीचे प्रमुख नेते मा.अशरफ वांकर यांची भेट

आमचे मार्गदर्शक लोकप्रिय सामाजिक नेते मा.सादिकभाई शेख यांनी आपले स्वतःचे साप्ताहिक  'विचार माध्यम' चे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी कार्यकारी संपादक जयंत लंगडे उपस्थित होते.
भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
मा.अशरफ वांकर

राज ठाकरेंची खंडणी आम्हाला नको: लष्कर

नवी दिल्ली - पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात संधी देणाऱ्या भारतीय चित्रपट निर्मात्यांना सैनिक कल्याण निधीस पाच कोटी रुपये देण्यासंदर्भात करण्यात आलेल्या बळजबरीबाबत भारतीय लष्कराकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

भारतामध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फवाद खान या पाकिस्तानी कलाकाराचा समावेश असलेल्या "ए दिल हैं मुश्‍किल‘ या दिग्दर्शक करण जोहर याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तीव्र आक्षेप घेतला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "काही अटी‘ घालत या चित्रपटाच्या प्रदर्शनास असलेला विरोध मागे घेत असल्याचे जाहीर केले. या अटींमध्ये सैनिक कल्याण निधीस पाच कोटी रुपये देण्यासंदर्भातील अटीचाही समावेश होता. या प्रकारासंदर्भात भारतीय लष्कराकडून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली आहे. याआधीच उरी येथे दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर लष्कराकडून करण्यात आलेल्या "सर्जिकल स्ट्राईक्‍स‘चे राजकारण झाल्याने लष्कराकडून नाराजी व्यक्‍त करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवरच, हा नवा प्रकार घडला आहे.
"लष्कराबरोबर राजकारण करु नका. भारतीय लष्करास अत्यंत शिस्तबद्ध, बिगर राजकीय व धर्मनिरपेक्ष पार्श्‍वभूमी लाभली आहे. तेव्हा अशा खालच्या स्तरावरील राजकीय चिखलफेकीमध्ये ओढले जावे, अशी लष्कराची इच्छा नाही,‘‘ असे संतप्त मत एका ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्याने व्यक्‍त केले आहे. ""सैनिक कल्याण निधीसाठी देण्यात येणारी रक्कम ही स्वेच्छेने देण्यात आली असल्यासच स्वीकारली जाते. खंडणी वा बळजबरी करुन देण्यास भाग पाडलेला निधी हा सैनिक कल्याण निधीसाठी स्वीकारला जात नाही,‘‘ अशी भावना अन्य एका अधिकाऱ्यानेही व्यक्त केली.
अनेक महिन्यांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर लष्कराने अंतिमत: स्वतंत्ररित्या निधी स्वीकारण्याचे मान्य केले असून यासाठीच सैनिक कल्याण निधीची (आर्मी वेलफेअर फंड बॅटल कॅज्युअल्टीज) स्थापना करण्यात आली आहे. मात्र राजकीय दबाव आणून निधी देण्यास भाग पाडले जाणे सर्वथा चुकीचे असल्याचे प्रातिनिधीक मत लष्करामधून व्यक्त करण्यात आले आहे. "सैनिक कल्याण निधीसाठी दिल्या जाणाऱ्या रकमेमागील भारतीय नागरिकांच्या भावनेबद्दल लष्कराच्या मनात जराही शंका नाही; मात्र ही रक्कम राज ठाकरेंच्या खंडणीचा भाग असू शकत नाही,‘ अशी तीव्र प्रतिक्रिया एअर व्हाईस मार्शल मनमोहन बहादूर (निवृत्त) यांनी व्यक्त केली आहे. 

राज ठाकरे यांच्या अटी 
ए दिल... चित्रपटाच्या सुरवातीला हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहणारा संदेश दाखवावा, भविष्यात पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालावी, ज्या निर्मात्यांनी पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात अभिनयाची संधी दिली आहे, त्यांनी प्रायश्‍चित म्हणून पाच कोटी रुपये सैनिक कल्याण निधीत जमा करावेत, अशा अटी बैठकीत राज ठाकरे यांनी घातल्या. 
 
 

विचार माध्यम साप्ताहिक अंक वितरण प्रसंगी अदिलभाई मोमिन,विशाल पोल,राफिकभाई मोमिन,

विचार माध्यम साप्ताहिक अंक वितरण प्रसंगी अदिलभाई मोमिन,विशाल पोल,राफिकभाई मोमिन,

फडणवीस सरकारची 2 वर्षे- तुमचा शेरा काय?

‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा‘ असा सवाल करीत राज्यात सत्ता मिळविणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारला पाहत पाहता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आपल्या गल्लीतील कार्यकर्ते, पुढारी ते राष्ट्रीय नेते, तसेच राजकीय तज्ञ फडणवीस सरकारचे मूल्यमापन करताना दिसतील. पण तुमच्या मनात गेल्या 2 वर्षांत या सरकारचं नेमकं काय ‘इम्प्रेशन‘, प्रतिमा तयार झालीय?... तुमच्या शब्दांत सरकारच्या कामगिरीचं विश्लेषण आम्हाला कंमेंट करा.
 

एटीएमच्या धर्तीवर सातबारा उतारे मिळणार

मुंबई - राज्यातील सर्व शेतजमिनींचे सातबारा उतारे ऑनलाइन केल्यानंतर राज्य सरकारने आता अजून एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना एटीएमच्या धर्तीवर यंत्रातून सातबारा उतारा दाखले उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्‍यात सध्या हा पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. येत्या जानेवारीपासून संपूर्ण राज्यभरात याची व्याप्ती वाढवली जाणार आहे. यंत्राद्वारे स्वतःच्या शेतजमिनीचा सातबारा उतारा मिळवणे हे आता व्हॉट्‌सऍप वापरण्याइतके सोपे होणार आहे. या प्रक्रियेमुळे वेळेसोबत पैशांचीही बचत होणार आहे.

डिजिटल भारत जमीन नोंदी अत्याधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यात सध्या विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. यामध्ये ई-मोजणी, ई-चावडी, ई-नोंदी, ई-दाखले, ई-नकाशे, ई-पुनर्सर्व्हे आदी बाबींचा समावेश आहे. याअंतर्गत राज्यातील अडीच कोटी सातबारा उतारे ऑनलाइन करण्यात आले आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपासून हे काम सुरू होते, ते आता जवळपास पूर्णत्वाला आले आहे. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील कोणत्याही शेतजमिनीचा उतारा आता ऑनलाइन उपलब्ध असणार आहे.

राज्यात सुमारे तेरा हजार तलाठी कार्यरत आहेत. एकेका तलाठ्याकडे एकापेक्षा अनेक गावांची जबाबदारी असते. मात्र, विविध सरकारी व्यापांमुळे तलाठी उपलब्ध नसणे आदी कारणांमुळे नागरिकांना सातबारा उताऱ्यांसाठी तलाठी कार्यालयाकडे अनेकदा हेलपाटे घालावे लागतात. अनेकदा सातबारा उताऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक लूट केल्याच्या घटना उघडकीस येत असतात. राज्यात दरवर्षी साधारण चाळीस लाख सातबारा उतारे काढले जातात. ही आकडेवारीच सातबारा उताऱ्यांमधील आर्थिक उलाढालीची कल्पना येण्यास पुरेशी आहे. सातबारा उतारे देण्यात होत असलेली ही आर्थिक फसवणूक टाळण्यासोबत इतर गैरप्रकार रोखून वेळ आणि पैसे वाचवणे हा या योजनेमागचा मुख्य हेतू आहे.
गावांमध्ये ग्रामपंचायत आणि इतर सरकारी कार्यालयांमध्ये ही यंत्रे ठेवली जाणार आहेत. एटीएमच्या धर्तीवर यंत्रातून सातबारा उतारा घेणे व्हॉट्‌सऍप वापरण्याइतके सोपे आहे. राज्य सरकारने आतापर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत सुमारे 370 सेवांचा समावेश केला आहे. महसूल विभागाच्या 51 सेवांचाही यात समावेश आहे. वेगवेगळ्या प्रकारची दीडशे प्रमाणपत्रे, उताऱ्यांचाही यात समावेश आहे.

अवघ्या 23 रुपयांना सातबारा
राज्य सरकारच्या ई-महाभूमी या "आपले सरकार‘शी लिंक असलेल्या पोर्टलवर गेल्यानंतर वापरकर्त्याचे नाव, पासवर्ड, जिल्हा, आधार क्रमांक, शेतजमिनीचा सर्व्हे क्रमांक आणि पेमेंट गेट-वेमधून पैसे भरल्यानंतर तत्काळ सातबारा उताऱ्याची प्रिंट शेतकऱ्यांच्या हातात येणार आहे. अशारीतीने सातबारा काढण्यासाठी शेतकऱ्याला अवघे 23 रुपये द्यावे लागणार आहेत, त्यामुळे वेळेची आणि पैशांचीही बचत होणार आहे. 

निखीलजी वागळे आपले अभिनंदन ..!

निखीलजी वागळे आपले अभिनंदन ..!

आपली ओळख नेहमी एक निर्भीड पत्रकार आणि सडेतोड बाणा आपल्या कार्यातून दिसतो.
हा माकड अभय वर्तक जातीय दंगली भडकवण्याचे काम नेहमी करतो आणि त्याने आपल्या व्यासपीठावरून जे मुस्लिम समाजावर जे खोटे आरोप केले आहेत त्याचा परिणाम त्याला भोगावा लागणार.
आपण अगदी प्रखरपणे त्याला विरोध करुन आपल्या शो मधून हाकलून दिले हे अतिशय महत्त्वाची कामगिरी करून दिली आणि आपण पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले जातीयवादी लोकांना आपण कसा धडा शिकवता....
यांच्यावर राज्यातून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु झाले आहे.
मराठा -मुस्लिम भावांचे प्रेम ह्या माकडाला पहावेना...


https://www.facebook.com/ashraf.wankar/videos/1303915209642111/
Posted By : Ashraf Wankar (Awami Vikas Party)

हा मनसेच्या आंदोलनाचा विजय- राज ठाकरे

मुंबई - पाकिस्तानी कलाकारांना यापुढे बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने हा मनसेने केलेल्या आंदोलनाचा विजय असल्याचे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमात पाकिस्तानी कलाकार असल्याने मनसेने सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. अखेर आज (शनिवार) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती करत या चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला. या बैठकीला राज ठाकरे, करण जोहर उपस्थित होते.

या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की या बैठकीत आमच्या तीन मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. ‘ऐ दिल है मुश्किल‘ चित्रपट सुरु होण्यापूर्वी उरी हल्ल्यात हुतात्मा जवानांना आदरांजली वाहणारा फलक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.. प्रोड्युसर्स गिल्ड यांनी पत्र लिहून आश्वासन दिले आहे, पाकिस्तानी कलाकार, गायक यांना चित्रपटात घेणार नाही. पाकिस्तानी कलाकारांना घेऊऩ काम करणाऱ्या प्रत्येक निर्मात्याने प्रायश्चित म्हणून लष्कराच्या वेलफेअर फंडाला पाच कोटी रुपये द्यावेत. या सर्व मागण्या मान्य झाल्याने आमच्या आंदोलनाचा विजय झाला आहे. मनसेने यापूर्वीही पाक कलाकारांना विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांचाच या संदर्भात मला फोन आला होता. पाक कलाकारांसाठी आपल्याकडे रेड कार्पेट का टाकले जाते. मला वाटत नाही, की हा चित्रपट पाहण्यासाठी भारतीय नागरिक जातील.

'ऐ दिल है' चित्रपट प्रदर्शनाला 'मुश्किल' नाही

मुंबई - करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाविरोधात मनसेने आक्रमक भूमिकेनंतल आज (शनिवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याने या चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि करण जोहर यांना भेटीला बोलाविले होते. या बैठकीत चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी मनसेकडून देण्यात आली. यापुढे पाकिस्तानी कलाकारांना घेऊऩ चित्रपट करणार नसल्याचे आश्वासन करण जोहर यांच्याकडून देण्यात आले. राज ठाकरे आणि करण जोहर आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर गेले. यामध्ये मुख्यमंत्री मध्यस्थी करत वाद मिटविला. 

‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमात पाकिस्तानी कलाकार असल्याने मनसेने सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. सिनेमा प्रदर्शित केल्यास मनसे आक्रमक स्टाईलने आंदोलन करेल, असा याआधीच मनसेने इशारा दिला होता. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. मल्टिप्लेक्स चालकांनी पाक कलाकारांचे चित्रपट दाखवल्यास मनसेची कामगार संघटना कामबंद आंदोलन पुकारेल असा इशारा देण्यात आला होता. मात्र, आता चित्रपट 28 ऑक्टोबरला प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Friday, October 21, 2016

कोणाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करु नका कारण कोणीच तुमच्याकडुन कायमस्वरुपी संतुष्ट होणार नाही.......

दुपारी दुकान बंद करुन घरी जेवायला चाललोच होतो.

तेवढ्यात एक कुत्रा तोंडात पिवशी घेऊन दुकानात आला , त्या पिवशीत सामानाची लिस्ट व पैसे होते.

मला आश्चर्य वाटले , मी लिस्ट मधील सर्व सामान त्या पिवशीमध्ये भरले व सामानाचे पैसे घेऊन बाकीचे पैसे त्या पिशवीत ठेवले .

कुत्रा ती पिशवी तोंडात घेऊन निघाला.

मी तो कुत्रा कुठे जातो हे पाहण्यासाठी त्याच्या मागे निघालो.

कुत्रा बसस्टाॅपवर येऊन एका बसमध्ये चढला , मी ही त्याच्या मागे बसमध्ये चढलो .

पिशवीवर स्टाॅपचे नाव लिहले होते कंडन्टरने पिवशीमधील पैसे घेऊन एक तिकीट त्याच्या पिशवीत ठेवले .

 स्टाॅप आल्यावर कुत्रा बरोबर त्याच स्टाॅपला उतरला , मी ही त्याच्या मागे उतरलो .

थोडे पुढे चालुन गेल्यावर कुत्रा एका घराजवळ थांबला व त्या घराची बेल वाजवली.

 एका माणसाने दार उघडले त्याच्या हातात काठी होती .

त्या माणसाने सामान घेऊन त्या कुत्र्याला काठीने खुप मारले .

मी त्या माणसाला माझी ओळख सांगुन कुत्र्याला मारण्याचे कारण विचारले.

तो माणुस म्हणाला साल्याने माझी झोपमोड केला चावी घेऊन गेला असता तर माझी झोपमोड झाली नसती.
,
,
,
,
जीवनाची ही खरी सच्चाई आहे
,
 लोकांच्या अपेक्षांचा अंत कधीच पुर्ण होत नाही
,

जिथे तुम्ही थोडे चुकलात किंवा त्यांना मदत करण्याचे थांबवाला की तुम्ही मागे केलेली मदत ते विसरुन तेच लोक तुमची निंदा चालु करतात
,

त्याकरीता तुम्ही तुमचे कर्म करत चला , कोणाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करु नका कारण कोणीच तुमच्याकडुन कायमस्वरुपी संतुष्ट होणार नाही.......

मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाची फसवणूक- राणे

मुंबई - मराठा आरक्षणाच्या सुनावणीदरम्यान सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यास वेळ मागितला नाही, अशी चुकीची माहिती देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल केली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही. न्यायालयात सरकारनेच प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ वाढवून मागितला. याबाबतचे पुरावे सादर करत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आगामी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्‍कभंग प्रस्ताव, तर विधानसभेत अविश्‍वास प्रस्ताव मांडणार असल्याचा इशारा कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांनी दिला.

गांधी भवनमध्ये मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आरक्षणाची सुनावणी उच्च न्यायालयात 13 ऑक्‍टोबर रोजी झाली होती. सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे अधिक अभ्यास व मराठा समाजाची माहिती जमा करण्यासाठी वेळ हवा असून, प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी केल्याचा दाखला राणे यांनी दिला. या वेळी न्यायालयात झालेल्या सुनावणीची कागदपत्रे त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. असे असतानाही मुख्यमंत्र्यांनी सरकार प्रतिज्ञापत्र सादर करण्यास तयार होते. मात्र, याचिकाकर्त्यांनीच वेळ मागितला असे धादांत खोटे विधान करत मराठा समाजाची फसवणूक केल्याची टीका राणे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी अशाप्रकारे पत्रकार परिषदेत जाहीरपणे असत्य विधान करणे हे त्यांच्या पदाला शोभणारे नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राणे यांनी केली. मराठा समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक स्थितीची संपूर्ण माहिती आघाडी सरकारने जमा केलेली आहे. सरकारकडे सर्व प्रकारची माहिती आहे. पण, मराठा आरक्षणाबाबत फडणवीस सरकार गंभीर नाही. अकारण वेळ मारून नेण्याचा त्यांचा प्रयत्न असून, ही मराठा समाजाच्या भावनांचा अनादर असल्याची टीकाही राणे यांनी केली.

Thursday, October 20, 2016

रायगड MIDC मध्ये स्फोट; 4 जखमी

रायगड- अज्ञात कारणांमुळे रायगड जिल्ह्यातील धाटाव औद्यागिक वसाहतीच्या (MIDC) परिसरामध्ये एका कंपनीत स्फोट झाला. त्यामध्ये चारजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

दीपक नायट्रेट या कंपनीत हा स्फोट झाल्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला. आगीचा लोट मोठ्या उंचीपर्यंत जात असल्याने आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले होते. आगीचा भडका दूरपर्यंत दिसत होता. 
जखमींपैकी तिघे किरकोळ जखमी झाले असून, एकावर उपचार करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. येथील अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली

रिलायन्स 'जिओ वेलकम ऑफर' 3 डिसेंबरपर्यंतच

मुंबई : मोबाईल सेवा क्षेत्रात गळेकापू स्पर्धा करणारी ‘जिओ वेलकम ऑफर‘ रिलायन्स जिओला 3 डिसेंबरलाच आटोपती घ्यावी लागणार आहे. याआधी 31 डिसेंबरपर्यंत ‘वेलकम ऑफर‘ सुरू राहणार होती, मात्र 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी मोफत सेवेची योजना राबवता येत नसल्याने दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) आदेशामुळे कंपनीला ‘वेलकम ऑफर‘ 3 डिसेंबरपर्यंतच सुरू ठेवता येईल. दरम्यान वेलकम ऑफर बंद होणार असली तरी 3 डिसेंबरपर्यंतच्या जिओ सिमकार्डधारकांना 31 डिसेंबरपर्यंत व्हॉइस आणि डाटा मोफत मिळेल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
जिओने 5 सप्टेंबरला ‘वेलकम ऑफर‘ जाहीर केली. ग्राहकांना जिओ सिमकार्ड घेऊन 31 डिसेंबरपर्यंत या योजनेत सहभागी होण्याची संधी होती. मात्र इतक्‍या प्रदीर्घ काळ चालणाऱ्या या "वेलकम ऑफर‘वर इतर कंपन्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी दूरसंचार नियामकाकडे या विरोधात धाव घेतली. मोफत कॉलिंग आणि डाटाबाबत दूरसंचार विभागाने जिओला क्‍लीनचीट दिली असली "वेलकम ऑफर‘ 31 डिसेंबरपर्यंत राबवता येणार नाही, असे म्हटले आहे. परिणामी 90 दिवसांसाठी म्हणजेच 3 डिसेंबरपर्यंत ग्राहकांना ‘वेलकम ऑफर‘नुसार मोफत कॉलिंग आणि डाटा योजनेत सहभागी होता येईल, असे कंपनीने म्हटले आहे. त्यानंतर जिओ नेटवर्कमध्ये सहभागी होणाऱ्या ग्राहकांना नव्या योजनेनुसार कॉल दर लागू केले जातील.
खरी स्पर्धा कमर्शिअल टॅरीफनंतरच
कॉलिंग आणि डाटा पूर्णपणे मोफत असल्याने ‘जिओ‘समोर इतर स्पर्धक कंपन्यांची दमछाक झाली आहे. दीड महिन्यात मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी करून ग्राहक जिओकडे आकर्षित होत आहे. मात्र जिओचे कमर्शिअल टॅरिफ प्लान लागू झाल्यानंतर दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये खरी स्पर्धा निर्माण होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

आमीरच्या 'दंगल'चा ट्रेलर रिलीज

आमीरच्या 'दंगल'चा ट्रेलर रिलीज

नवी दिल्ली - मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला अभिनेता आमीर खान याच्या बहुचर्चित ‘दंगल‘ या चित्रपटाचा ट्रेलर आज (गुरुवार) रिलीज करण्यात आला आहे. 
आमीर खान ‘दंगल‘ चित्रपटात कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. आमीरने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली असून, यासाठी त्याने आपल्या वजनातही वाढ केली आहे. हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये मातीतून आमीरचा आक्रमक चेहरा दाखविण्यात आला होता. कुस्तीपटू महावीरसिंग फोगट यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. महावीरसिंग यांनी आपल्या गीता आणि बबिता या दोन मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण दिले यावर हा चित्रपट आहे.