दिवाळी संपल्यानंतर लगेच चार दिवसानंतर हवेत गारठा वाढू लागला असून साताऱयातही गारठा आहे. सायंकाळी पाच वाजताही थंडीचा जोर वाढत जावून मध्यरात्रीपर्यंत कमालीची थंडी नागरिकांना जाणवत आहे. गुलाबी थंडीचे ठिकाण असलेले महाबळेश्वरमध्येही 15 अंशावर थंडी गेली आहे. उबदार कपडयांना मोठी मागणी वाढली आहे. साताऱयातील बाजारपेठेत उबदार कपडय़ांची विक्रीमध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापाऱयांनी सांगितले.
सातारा जिह्यामध्येही थंडी गेल्या सहा दिवसांपासून जाणवू लागली आहे. सातारा जिह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये सध्या पिक काढणीची कामे जोमात सुरु असून ही कामेही सायंकाळी 5 वाजताच बंद करुन शेतकरीवर्ग घराकडे परतू लागला आहे. सांयकाळी शेकोटय़ा पेटत आहेत. शहरातही थंडीची जाणीव सायंकाळी पाच वाजता होत असून थंडीची तीव्रता पहाटेपर्यंत वाढत जात आहे. सातारा शहरातील तापमानाची नोंद कमाल 27 तर किमान 16 अंश अशी झाली आहे. शहरामध्येही थंडीची चाहूल लागल्यामुळे राजवाडा, बसस्थानक परिसरातील कापड दुकानांमध्ये उबदार कपडय़ांना मोठी मागणी आहे. त्यामध्ये स्वेटर, कानटोपी, मफलर, हातमोजे, पायमोजे यांना मागणी होत असून बॅण्डनुसार किमती आहेत.गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापाऱयांनी सांगितले. तसेच सायंकाळी वाढत असलेल्या थंडीमुळे दमा, खोकला,अंगदुखी यासारखे विकार वाढू लागले आहेत. त्यामुळे दवाखान्यांच्यासमोर रुग्णांची गर्दी दिसत आहे.
उबदार कपडे
थंडीपासून प्रत्येकाने संरक्षण केले पाहिजे. उबदार कपडे परिधान करणे गरजेचे आहे. ज्यांना सर्दीचा त्रास होत आहे. अशांनी डॉक्टरांच्या सल्यानुसार गरम वाफारा घेणे गरजेचे आहे. सकाळी थोडासा व्यायाम करणे गरजेचे आहे.
सातारा जिह्यामध्येही थंडी गेल्या सहा दिवसांपासून जाणवू लागली आहे. सातारा जिह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये सध्या पिक काढणीची कामे जोमात सुरु असून ही कामेही सायंकाळी 5 वाजताच बंद करुन शेतकरीवर्ग घराकडे परतू लागला आहे. सांयकाळी शेकोटय़ा पेटत आहेत. शहरातही थंडीची जाणीव सायंकाळी पाच वाजता होत असून थंडीची तीव्रता पहाटेपर्यंत वाढत जात आहे. सातारा शहरातील तापमानाची नोंद कमाल 27 तर किमान 16 अंश अशी झाली आहे. शहरामध्येही थंडीची चाहूल लागल्यामुळे राजवाडा, बसस्थानक परिसरातील कापड दुकानांमध्ये उबदार कपडय़ांना मोठी मागणी आहे. त्यामध्ये स्वेटर, कानटोपी, मफलर, हातमोजे, पायमोजे यांना मागणी होत असून बॅण्डनुसार किमती आहेत.गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापाऱयांनी सांगितले. तसेच सायंकाळी वाढत असलेल्या थंडीमुळे दमा, खोकला,अंगदुखी यासारखे विकार वाढू लागले आहेत. त्यामुळे दवाखान्यांच्यासमोर रुग्णांची गर्दी दिसत आहे.
उबदार कपडे
थंडीपासून प्रत्येकाने संरक्षण केले पाहिजे. उबदार कपडे परिधान करणे गरजेचे आहे. ज्यांना सर्दीचा त्रास होत आहे. अशांनी डॉक्टरांच्या सल्यानुसार गरम वाफारा घेणे गरजेचे आहे. सकाळी थोडासा व्यायाम करणे गरजेचे आहे.


No comments:
Post a Comment