विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...

- विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...LIVE: हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार यांचे निधन निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी कायम, दोषींची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली #NirbhayaRapeCase कुडाळ - दहावीत कमी गुण मिळाल्याने 16 वर्षीय मुलीची आत्महत्या; नदीत सापडला मृतदेह राज्य सरकारची भूमिका ,विचारसरणी ही संतांची आहे, मनूची नाही - मुख्यमंत्री #devendrafadnavis #nagpur #sambhajibhide संभाजी भिडे तुकाराम महाराज आणि इतर संतांपेक्षा मनू विचार सरणी मोठी आहे, असे वक्तव्य करतात, हे काय चाललंय, याच्या मागे बोलविता धनी कोण : अजित पवार #sambhajibhide पावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना आज (सोमवार) सुटी घोषित, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा #VinodTawde विधानभवनातील तयारीसंदर्भात कमतरता करणाऱ्याची चौकशी करून कारवाई केली जाईल #nagpur #devendrafadnavis मुंबईत रविवारी दिवसभरात १२२ मिमी पावसाची नोंद #rain #monsoon #mumbai नागपूरच्या पुरातील पीडितांना नुकसान भरपाई देणार. मुख्यमंत्री फडणवीस .....

Monday, November 14, 2016

सातारा थंडीने गारठला

दिवाळी संपल्यानंतर लगेच चार दिवसानंतर हवेत गारठा वाढू लागला असून साताऱयातही गारठा आहे. सायंकाळी पाच वाजताही थंडीचा जोर वाढत जावून मध्यरात्रीपर्यंत कमालीची थंडी नागरिकांना जाणवत आहे. गुलाबी थंडीचे ठिकाण असलेले महाबळेश्वरमध्येही 15 अंशावर थंडी गेली आहे. उबदार कपडयांना मोठी मागणी वाढली आहे. साताऱयातील बाजारपेठेत उबदार कपडय़ांची विक्रीमध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापाऱयांनी सांगितले.
सातारा जिह्यामध्येही थंडी गेल्या सहा दिवसांपासून जाणवू लागली आहे. सातारा जिह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये सध्या पिक काढणीची कामे जोमात सुरु असून ही कामेही सायंकाळी 5 वाजताच बंद करुन शेतकरीवर्ग घराकडे परतू लागला आहे. सांयकाळी शेकोटय़ा पेटत आहेत. शहरातही थंडीची जाणीव सायंकाळी पाच वाजता होत असून थंडीची तीव्रता पहाटेपर्यंत वाढत जात आहे. सातारा शहरातील तापमानाची नोंद कमाल 27 तर किमान 16 अंश अशी झाली आहे. शहरामध्येही थंडीची चाहूल लागल्यामुळे राजवाडा, बसस्थानक परिसरातील कापड दुकानांमध्ये उबदार कपडय़ांना मोठी मागणी आहे. त्यामध्ये स्वेटर, कानटोपी, मफलर, हातमोजे, पायमोजे यांना मागणी होत असून बॅण्डनुसार किमती आहेत.गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापाऱयांनी सांगितले. तसेच सायंकाळी वाढत असलेल्या थंडीमुळे दमा, खोकला,अंगदुखी यासारखे विकार वाढू लागले आहेत. त्यामुळे दवाखान्यांच्यासमोर रुग्णांची गर्दी दिसत आहे. 

उबदार कपडे
थंडीपासून प्रत्येकाने संरक्षण केले पाहिजे. उबदार कपडे परिधान करणे गरजेचे आहे. ज्यांना सर्दीचा त्रास होत आहे. अशांनी डॉक्टरांच्या सल्यानुसार गरम वाफारा घेणे गरजेचे आहे. सकाळी थोडासा व्यायाम करणे गरजेचे आहे.

 

No comments:

Post a Comment